डॉक्टर आमचा मुलगा तीन वर्षाचा झाला तरी अजून नीट बोलत नाही, त्याच्यात काय समस्या असेल.?
डॉक्टर आमचा मुलगा दुसरीत आहे त्याच्या काहीच लक्षात राहत नाही, शिकवलेलं काहीच समजत नाही, अजून त्याचा लघवीवरही ताबा नाही. आम्ही काय करू.
बऱ्याचदा या सगळ्या समस्यांच एकच निदान असत मुलामधलं मतिमंदत्व. आपल्याकडे पालकांना अजूनही मुलांच्या समस्याबद्दल निटशी माहिती नसते किंवा पुरेशी जागरूकता नसते. त्यापैकीच हि सुद्धा एक आहे. खूप वेळा असा आढळून येत कि मूल ५-६ वर्षाच होऊन पहिली दुसरी जाईपर्यंतसुद्धा आपलं मूल काहीतरी वेगळं आहे याची अजिबात जाणीव नसते.शाळेत इतर मुलांच्या मानाने आपले मूल मागे पडतंय, असे वाटल्यावर पालक प्रथम मुलाला घेऊन त्याची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ओषध घायला म्हणून डॉक्टरकडे येतात.
अशा वेळी मुलांना तपासून त्यांच्या पालकांना त्यांचं मूल मतिमंद आहे , हे कठोर सत्य सांगणे हि फार नाजूक बाब होऊन बसते.
मुलामध्ये मतिमंद येण्यास खालील पैकी कुठलीही गोष्ट कारणीभूत ठरू शकते.
१. गुणसूत्रांमध्ये दोष - काही कारणांनी जर बाळाच्या गुणसूत्रांमध्ये काही दोष निर्माण झाला तर बाळाला मतिमंदत्व येऊ शकत .
२. मेंदूला इजा होणे. मेंदूला इजा होण्याची अनेक करणे असू शकतात.गरोदरपणात आईला झालेला जंतुसंसर्ग उदा. रुबेला. नागीण इत्यादी किंवा गरोदरपणात क्ष किरणोत्सर्जन्य, गरोदर मातेचं कुपोषण किंवा विषारी अन्नाची बाधा, मद्य सेवन धूम्रपान, तंबाखू खाणे इत्यादी.
३. प्रसूतीच्या वेळी मेंदूला झालेलीं इजा- काही कारणाने बाळाला प्राणवायू न मिळणे (बाळ जन्मात लवकर न रडणे.) किंवा जन्मात होणारी गंभीर स्वरूपाची कावीळ.
४. जन्मानंतर बाळाचं कुपोषण , विषारी पदाथाच अन्नातून सेवन, डोक्याला मार लागून मेंदूला इजा होणे, मेंदूला किंवा त्याच्या आवरणाला होणारा जंतुसंसर्ग इत्यादी.
वरील कारणामुळे जेव्हा मेंदूवर परिणाम होतो तेव्हा असं दिसून येत कि , मुलाच्या वाढीच्या काळात त्याची बौद्धिक क्षमता आणि वर्तणूक हि त्याच्या वयाच्या मानाने कमी क्षमतेची असते. ज्याला आपण मतिमंदत्व म्हणतो. मतिमंदत्वाचं गांभीर्य प्रत्येक मुलामध्ये निरनिराळं असू शकत .
मतिमंद मुलामध्ये सामान्यतः खालील गोष्टी आढळून येतात.
या मुलामध्ये बऱ्याचदा अगदी सुरुवातीपासून बौद्धिक वाढ इतर मुलांपेक्षा हळू होत असल्याचं दिसून येते त्यांच्या वाढीच्या संपूर्ण काळात त्यांची मानसिक वाढहि अपुरी घडून येते. या मुलामध्ये मान धारण, पालथं पडणं, रंगानं, चालणं असे शारीरिक विकासातील टप्पे उशिरा होऊ शकतात. किंवा आवाजाच्या दिशेने मान वळवण, आजूबाजूच्या गोष्टींना प्रतिक्रिया देणे बोलणं बोललेलं समजणं या गोष्टीही या मुलांमध्ये उशिरा होऊ शकतात जसे जसे मूल मोठं होऊ लागतं तसतसं वयाच्या इतर मुलांपेक्षा त्याची प्रगती मंद गतीने होते उदा.बोलायला खूप उशिरा शकतो किंवा इतर मुलांप्रमाणे त्याला कुत्रा, मांजर, गाडी, विमान अशा सोप्या गोष्टी सुद्धा ओळखता येत नाही या मुलांमध्ये श्रवणदोष, दृष्टीदोष किंवा इतर संवेदनांमध्ये दोष, भाषा शिकण्यातील दोष, मज्जासंस्थेतील दोष या गोष्टींचं प्रमाण इतर मुलांपेक्षा अधिक असल्याचे आढळून येते. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून अशी मुलं विकासामध्ये इतरांच्या तुलनेत मागे पडू लागतात. मग शाळेत जाण्याची गोडी नसणं, शिकलेल्या न समजणं वारंवार नापास होणं, लिहिता-वाचता न येईल अशा समस्या आढळू लागतात शिवाय या मुलांमध्ये कमी वैचारिक क्षमता, अतिचंचलता, एकाग्रतेचा अभाव, दोषी स्मरणशक्ती इत्यादीमुळे त्याची शैक्षणिक प्रगती खूपच मंदावते. या मुलांच्या भावनिक व मानसिक आजारावर तसेच आकडी सारख्या शारीरिक समस्या वर होमिओपॅथिक औषधांची खूप मदत होऊ शकते डॉक्टर भरत चौगुले यांच्या आरोग्य होमिओपॅथी क्लिनिक मध्ये अशा आजारावर उपचार केले जातात.