Tuesday, April 28, 2020

ब्रिटिश काळातील प्लेगची साथ

#ब्रिटिश काळातील प्लेगची साथ
1896- 1897 मध्ये आलेली प्लेगची साथ ही चीनमध्ये 19 व्या शतकाच्या सुरुवातीलाच आली होती. त्यावेळी सत्तेवर असलेले क्विंग राजघराणे रोग्यांना क्वारंटीन करण्याबाबत निरुत्साही होते कारण त्यामुळे ते कुटुंबापासून विलग झाले असते. त्यामुळे एका शतकात प्लेग पूर्ण चीनमध्ये पसरला, तिथून आग्नेयेकडे आणि तिथून बंदर असलेल्या शहरांत पसरला. 1894 पर्यंत जवळजवळ 70000 लोक त्यामुळे मृत्यू पावले होते. व्यापारी मार्गाने 1896 मध्ये प्लेग मुंबईला पोचला.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला घुशींनी मुंबईच्या कौलारू घरांचा आणि चाळींचा आश्रय घेतला. ह्या घुशीच्या अंगावर गोचिडी होत्या ज्यांनी प्लेग चे जिवाणू घराघरात आणि एका माणसापासून दुसऱ्यापर्यंत पोचवले. कोरोना प्रमाणेच प्लेग चे लगेच निदान करणे कठीण होते कारण ताप आल्यावर टायफस किंवा मलेरिया ची शक्यता मानली जायची. इन्फेक्शन झाल्यावर 6 ते 7 दिवसांनी प्लेगची लक्षणे दिसायची ती म्हणजे जांघेत किंवा काखेत गाठ येणे. केवळ 48 तासांत रोगी मरण पावत असे. मृत्युदर 60% इतका जास्त होता.
ब्रिटिश सरकारपुढे दोन आव्हाने होती औषध शोधणे आणि साथ आटोक्यात आणणे. 1896 च्या दुष्काळा मुळे आधीच अर्थव्यवस्था ढासळली होती. आणि सुरुवातीला सरकारने ही साथ गंभीरपणे घेतली नाही. डॉक्टरांना सुद्धा हा प्लेग आहे हे समजण्यास वेळ लागला कारण त्यावेळी ही लक्षणे असलेला दुसरा रोग मुंबईत दिसून येत होता. त्यामुळे केसेस जेव्हा खूप वाढल्या तेव्हा सरकारने स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायचे ठरवले. सरकारने एक कायदा पास केला ज्याला 1897 चा एपीडेमिक डिजीज ऍक्ट असे म्हणतात.
ह्या कायद्यामुळे अधिकाऱ्यांना प्लेगचा प्रसार थांबवण्यासाठी लागणारे सर्व उपाय करण्याचे अधिकार मिळाले. यात मक्केची यात्रा रद्द करणे, भारतातून इमिग्रेशन बंद करणे, रेल्वे बुकिंग रद्द करणे, धार्मिक संमेलने रद्द करणे, जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यावर निर्बंध हे समाविष्ट होते. हे ह्या काळातील उपायांशी साधर्म्य दाखवत आहेत कारण त्यांच्या परिणामकारकतेमुळे हे उपाय एवढ्या वर्षांत बदलले नाहीयेत.
सरकारने प्लेग संशोधन कमिटी चीही स्थापना केली. डॉ आर मन्सर हे सर्जन त्या कमिटीचे मुख्य होते आणि ते प्लेग वर उपयोगी ठरेल अश्या औषधांवर संशोधन करत होते. आणखी एक मेंबर डॉ इ इन हनकीन हे अवध येथील बॅक्टरीऑलॉजिस्ट होते आणि त्यांनी जिवाणूंची पाणी, माती आणि घरगुती वस्तूंमधील वाढ ह्या विषयावर संशोधन सुरू केले. ह्या कमिटीने डॉ वॉलडेमर हाफकीन ह्या बॅक्टरीओलॉजिस्ट ला कलकत्याहून मुंबईला बोलावले. त्यांनी परेल मध्ये प्रयोगशाळा स्थापन करून रोगनिवारणासाठी संशोधन सुरू केले.
आधीच्या काही असफल प्रयोगानंतर डॉ हाफकीन यांनी प्लेगचे जिवाणू निरोगी प्राण्याला टोचून इम्युन सिस्टीम ला चॅलेंज देण्याची प्रोसेस सुरू केली ज्यामुळे तो त्यानंतर रोगाला इम्युन होईल. त्यांनी इन्फेक्टेड उंदरांवर प्रयोग सुरू केले आणि त्यांच्यापासून जिवाणू वेगळे करून ते वरती घरगुती तूप किंवा खोबरेल तेलाचा थर असलेल्या  मीट ब्रॉथ (मटणाचे पाणी) मध्ये वाढवले. हे लॅब मध्ये वाढवलेले जिवाणू धाग्यांप्रमाणे दिसत होते आणि त्यांना Haffkine stalactites असे म्हणतात. हे जिवाणू दोन आठवडे वाढून दिल्यावर त्यांना उष्णतेच्या साहाय्याने दुर्बल करण्यात आले.
जेव्हा दुर्बल जिवाणू निरोगी व्यक्तीला टोचण्यात आले तेव्हा अँटिबॉडीज त्यांना परिणामकारक पणे नष्ट करू शकल्या. पण लढाई अर्धीच जिंकली होती. कारण समाजातील बरेच लोक ह्या वैज्ञानिक प्रगतीवर टीका करत होते जे आताही दिसत आहे. बऱ्याच लोकांनी अंधश्रद्धेमुळे हाफकीन ची लस टोचून घेण्याची विनंती अमान्य केली. तरीही तो तुरुंगातील कैदी आणि स्वतःहून लस टोचून घेणाऱ्यांवर प्रयोग करण्यात यशस्वी झाला. त्यामुळे प्लेग चा मृत्यू दर 97.4% ने कमी झाला. ब्रिटिश सरकारकडे आता लस होती.
ब्रिटन मधील ब्युबोनिक प्लेग च्या अनुभवामुळे सरकारला रोग निवारणाबाबत धडा मिळाला होता. रोग्याला निरोगी व्यक्तीपासून वेगळे करणे हा त्यातील एक धडा होता. मुंबई सरकारने भारत सरकारच्या विलगिकरणाच्या ऑर्डर्स चे पालन करण्यासाठी एक कमिटी नेमली. त्याचे महत्वाचे उद्दिष्ट पावसाळ्या आधी प्लेग चा प्रसार थांबवणे हे होते. कमिटीने क्वारंटीन ची उद्दिष्टे स्पष्टपणे तयार केली आणि सरकारी अधिकाऱ्यांनी संसर्ग झालेल्या रोग्यांना शोधून त्यांचा हॉस्पिटलमध्ये इलाज सुरू करावा अश्या ऑर्डर्स दिल्या. त्याचबरोबर त्यांच्याशी निकटच्या संपर्कात आलेल्या ब्याक्तीना क्वारंटीन कॅम्पस मध्ये हलवणे गरजेचे होते. सैनिकांना घरोघरी जाऊन रोगी शोधण्याचे काम दिले गेले. निर्जंतुकिकरणासाठी समुद्राचे पाणी पंपाच्या साहाय्याने दिवसा आणि रात्री सांडपाण्याच्या पाईप्स मध्ये सोडले जाऊ लागले. सरकारी अधिकारी रस्ते आणि पादपथ चुनकळी ने स्वच्छ करू लागले. सरकारने आदेश दिले की घरे निर्जंतुक करण्यात यावी, घरातील वस्तू सूर्यप्रकाशात वाळवाव्यात आणि इन्फेक्टेड घरे नष्ट करण्यात यावीत.
रोगप्रसार झालेली घरे शोधताना जात आणि धर्माचे विभाग लक्षात घ्यावेत, तसेच विलगिकरण कक्षात स्त्रिया व पुरुषांसाठी वेगळे विभाग असावेत अश्या ऑर्डर्स दिल्या गेल्या. बऱ्याच ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम यांच्यासाठी खाजगी हॉस्पिटल पुढे आली. मृतदेहाचे दहन वा दफन करण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली. ह्यासाठी आधी कारबॉलिक पावडर फवारून फिनाईल ने मृतदेह धुतला जाई.
कागदावर ह्या सर्व तर्कशुद्ध व्यवस्था होत्या पण प्रत्यक्षात खूप   अडचणी येऊ लागल्या. निरोगी व्यक्तीला रोग्यापासून वेगळे करणे हा रोगप्रसार टाळण्याचा एकमेव मार्ग होता, पण सैनिकांच्या वागण्यामुळे लोकांत संताप पसरला. लोकांनी सैनिकांचे उद्धट वागणे आणि हॉस्पिटल व विलगीकरण कक्षातील कमी दर्जाच्या व्यवस्थेबद्दल तक्रारी केल्या. गिरणी कामगार आर्थर रोड हॉस्पिटल (आता कस्तुरबा) समोर जमले व ते पाडण्याची धमकी देऊ लागले. कुटुंबातील व्यक्तीना हॉस्पिटल किंवा विलगिकरण कॅम्प मध्ये ठेवल्यावर त्यांच्या घराकडे बघण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी घेतली नाही. तिथून परत आल्यावर आपल्या चिजवस्तूंची चोरी झालेली किंवा त्या नष्ट झाल्याचे दिसून येत होते.
सरकारच्या जबरदस्तीने वागण्याच्या पद्धतीमुळे लोक शहराबाहेर जाऊ लागले आणि त्याने प्लेग अधिकच पसरला.
लोकांच्या क्षोभाने पुण्यात गंभीर रूप धारण केले. वॉल्टर चार्ल्स रँड ह्या इंडियन सिविल सर्व्हिस च्या अधिकाऱ्याचा, जो प्लेग साठी कमिशनर म्हणून नियुक्त केला गेला होता, त्याचा खून करण्यात आला. हा खून करणाऱ्या चाफेकर बंधूंना नंतर फाशी देण्यात आले.
हा लोकांचा लढा आपल्यावर राज्य करणाऱ्यांच्या त्रुटी अधोरेखित करतो. ह्या निर्णायक काळात लोक किती प्रतिकूल परिस्थितीतुन जात आहेत हे समजून घेण्यात सरकार अपयशी ठरले. त्यांच्या अत्याचारी वर्तणूकीचे वर्णन 'शक्तिशाली त्याला हवे ते करतो आणि दुर्बलांना सहन करावे लागते' ह्या शब्दांत होऊ शकते.
सरकारने प्रयत्न करूनही जवळजवळ 50000 लोक एकट्या मुंबईत मरण पावले तर 3 लाखांच्या वर भारतात मरण पावले. पण हे आकडे मान्य न करता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जगाचे चांगले मत होण्यासाठी रेकॉर्ड मध्ये बदल केले.
अर्थात प्रयत्न पूर्णपणे वाया गेले नाहीत. ब्रिटिश सरकार साथ आटोक्यात आणण्यात यशस्वी झाले. पण यासाठी बऱ्याच जीवांची किंमत मोजावी लागली. डॉ हाफकीन यांच्या लसीने बरेच जीव वाचवले. त्यामुळे देशाच्या साथ निर्मूलनाच्या मार्गदर्शक आराखड्यात यातील काही उपाय कायमची जागा मिळवून राहिले आणि 1904 मध्ये पुन्हा अमलात आणले गेले.
त्यातील बरेच उपाय सध्याच्या साथीतही वापरले जात आहेत.